जेजुरी
सुपे मुक्कामी "खैरे" या नावाचे मराठा पाटील होता .
त्यांच्या वंशात एक "भाव्या" या नावाचा एक मार्तंड भक्त होता .
तो दर रविवारी सुप्याहून निघून कडेपठारी येत असे.
मार्तंडास अष्टभावें लीन होऊन पुन्हा सुप्यास जात असे .
पुढे त्यास येणे कठीण झाले.
कऱ्हा नदी ओलांडून अलीकडे आला.
व मूर्च्छित पडला.
उठल्यावर त्यास घोड्याचे खुर मातीत उमटलेले दिसले.
त्या ठिकाणास त्याने "घोडेउड्डाण "नाव दिले .
पुढे तो "जयाद्री "क्षेत्री (जेजुरी) निघून गेला .
त्याने झालेला प्रकार गावातील लोकांना सांगितला.
लोकांनी देवाची विधिवत यात्रा केली .
पुढे "विरपाळ "विरमल्ल या नावाचा एक मार्तंड भक्त होता.
त्याने सन1381 मध्ये मंदिराच्या आतील गाभऱ्याचे काम केले ..
खटाव मधील" राघो बंबाजीस "दिल्लीच्या बादशाहने जुन्नर प्रांतात बंदोबस्तासाठी नेमले होते.
तो मोठा मार्तंड भक्त होता.
त्याने मार्तंडाच्या यात्रेस आला असता.
त्याच्या मनात आले की या मार्तंडाच्या कृपेने मला सर्व प्राप्त झाले.
म्हणून या स्थळी आपण काहीतरी पुण्य करावे.
म्हणून सन1635 मध्ये गाभऱ्याचे काम व पुढील सदरचे काम
त्याने करवून घेतले .
सभोवती कोटाचे काम व ओवऱ्या बांधल्या.
या कामास त्याचे कोट्यवधी रुपये खर्च झाले .
राघो बंबाजीने पर्वताचे उत्तर बाजूस विहीर बांधली.
त्या विहिरीस "फकिरची विहीर "म्हणतात .
या राघो बंबाजीस बादशाह "राजे "या पदविने सन्मानित केले .
त्यांच्या वंशास "खटावकर" महाराज असे म्हणतात .
गझनीचा बादशाह याने जेजुरीचा गड फोडण्याचा प्रयत्न केला.
असता त्यास ते भुंग्यामुळे शक्य झाले नाही.
देवास शरण जाऊन त्याने एक लक्ष रुपयांचा भुंगा तयार करून देवास वाहिला..
तो पाचूच्या होता .
व भुंग्याच्या आकाराचा होता.
0 Comments