Advertisement

प्रतिशिवाजी " सरनौबत नेतोजी पालकर (Netaji Palkar)

" प्रतिशिवाजी " सरनौबत नेतोजी पालकर

नेताजी पालकर हे दीर्घ काळ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दुसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मुळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली.. अफजलखानाच्या वधाच्या वेळी अफजलखानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. 

पुरंदर तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे, सरसेनापती नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले. तेथे आदिलशाही सेनापती सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात सरसेनापती नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली. महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले. मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्‍याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मुघलांकडे वळवले.

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्ग्र्‍याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले, तेव्हा शिवाजी सुटला, आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारूर येथे होते. दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्जा राजे जयसिंह यानी नेताजी आणि त्याचे चुलते कोडाजी याना अटक केली दिलेरखानाने त्याना आग्राला पाठवयची व्यवस्था  केली ४दिवसाच्या अतोनात हालानंतर नेताजीनी धर्मातर करण्यास परवानगी दिली दि, २७मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलिम झाले व त्याचे "मुहम्मद कुलीखान " नामकरण करण्यात आले,जुन १६६७ औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे काबुल कंदाहाराच्या मोहीमेवर रवाना झाले, लाहोर जवळ आल्यावर त्यांनी पळुन जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला ,पण पुढे ९वर्षे  काबुल कंदाहार येथेच  मोहीमेवर होते
श्रींमत छत्रपती महाराज्याच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते, त्यावेळी औरंगजेबाला "प्रतिशिवाजी"ची आठवण झाली, मग त्याने मुहम्मद कुलीखानास दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहीमेवर पाठवले, मे१६६७ रोजी पश्चाताप झालेली नेताजी पळुन रायगडावर महाराजांकडे आले, १९जुन १६७६ रोजी  श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याना पुन्हा विधिवंत हिंदु धर्मात घेतले.  
महाराज आणि नेताजी  नातलग आहेत असे उल्लेख मोघली अखबरातुन मिळतात,महाराजाची पत्नी पुतलाबाई राणीसाहेब याचे माहेर पालघर घराण्यातले आहे, महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले, पण जानोजी आणि पुतलाबाई राणीसाहेब काय नाते होते हे फार मोठे प्रश्नचिन्ह अजूनही आहे ""छावा ""नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे संख्खे काका होते, 
नेताजी पालकर यांची समाधी तामसा (ता. हदगाव, जि, नादेंड) इथे आहे

Post a Comment

0 Comments